Wednesday, September 29, 2010

शिखराचा चेहरा बदलला; पायव्याला आता बदलावेच लागेल!





सकाळ वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक आणि जेष्ठ्य आंबेडकरी लेखक उत्तम कांबळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही ऐतिहासिक घटना मराठी सारस्वतांच्या प्रांतात घडली. याचा आनद तमाम पुरोगामी माणसाला झाला असला तरी ज्या पायावर मराठी सारस्वतांचा सगळा डोलारा उभा आहे तों पाया बदलल्याशिवाय किंवा नवी पायाभरणी झाल्याशिवाय नव्या सांस्कृतिक संवादाला आरंभ होणार नाही.
मुळात निवडणुकीच्या माध्यमातून या सर्वोच्च सांस्कृतिक पदावर आरूढ होता येते. हा एका प्रक्रियेचा भाग आहे. ही प्रक्रिया निश्चितच वादातीत नाही. या वादाला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. परंतु कोताही पर्याय अजून पुढे आला नाही. लोकशाहीत ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया मानली जाते. बहुमताच्या आधारावर ठरणारा निर्णय लोकशाहीत सर्वांनाच मान्य करावा लागतो. याचा अनेकांना फटका बसला पानतावणे सरांना या प्रक्रियेत यशस्वी होता आले नाही. कारणांचा गुंतावळा बाजूला सारून आपण आता हेच म्हणू शकतो की पानतावणे सराना ही प्रक्रिया मानवली नाही आणि ज्याना ती मानवणार नाही हे काळात होते ते या वाटेलाच गेले नाही विंदा,बाबुराव बागुल, रावसाहेब कसबे आदी काही सन्माननीय नवे आहेत. उत्तमराव या वाटेने गेले आणि यशस्वी झाले. केवळ यशस्वी झाले नाही तर दणदणीत विजयी झाले. भल्याभल्यांनी तोंडात बोटे टाकावी अशी ही घटना आहे.
पदामुळे माणूस मोठा होतो की, माणसांमुळे पदाची प्रतिष्ठा वाढते? हे सगळे प्रश्न उत्तमरावांच्या संदर्भात गैरलागू आहेत. ज्या विचारावर त्यांची निष्ठा तो विचार हे पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. तो त्यांनी जपला म्हणूनच अत्यंत तळातल्या माणसांपासून तर शिखरावरच्या प्रतिष्ठित माणसांपर्यंत अगदी मनापासून प्रेम करणारी मंडळी त्यांच्या भोवती निस्वार्थपणे उभी आहेत. हे संबंध समाज जाणतो. मुळात प्रश्न आहे तो उत्तमरावानी निवडलेला हा मार्ग त्यांच्या विचाराचा वाहक ठरेल काय? याचे उत्तर आज जरी नेमकेपणाने देता येत नसले तरी उद्या मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निश्चित पणाने द्यावे लागणार आहे.
अगदी शून्यातून उत्तमरावानी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. वृत्तपत्र विकणाऱ्या पोरापासून तर सकाळच्या न्यूज नेटवर्क संपादक पर्यंतचा पत्रकारितेतला हा शिखरपर्यन्त्चा आणि एक मराठी लेखक म्हणून अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पद हा सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास पार करताना त्यांनी आपल्या विचाराशी कुठलीही तडजोड केली असेल असे आज तरी वाटत नाही. अगदी सांगलीचे स्वागताध्यक्षपद भूषवताना आणि आर आर आबा सारखा जवळचा स्नेही जपताना त्यांच्या वैचारिक निष्ठेला कधीच तडा गेला नाही. याउलट राजकीय पदांसाठी आंबेडकरी विचारवंतांचे झालेले कान्ग्रेसीकरण आणि स्वताला आंबेडकरी नेते म्हणवणाऱ्या माणसांनी सत्तेसाठी केलेले अभद्र लांगुलचालन हे आपण जेव्हा पाहतो त्या तुलनेत उत्तमरावानी जपलेली वैचारिक निष्ठा ही कितीतरी पटीने अधिक मोलाची आहे.
बदलत्या समाज वास्तवात बदलणारा माणूस आणि नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी स्वताला आणि समाजाला बदलाविणारा माणूस ही दोन्ही मानस प्रतिष्ठित असली तरी, बदलत्या समाज वास्तवात बदलणाऱ्या मान्सानापेक्षा नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी समाजाला बदलणारया माणसाची अधिक गरज समाजाला आहे. उत्तम कांबळे या नावाकडून ही अपेक्षा करणे गैर नाही. आज त्यांच्या रूपाने या प्रतिगामी शिखराचा चेहरा बदलला; पायव्याला आता बदलावेच लागेल!

No comments:

Post a Comment