Thursday, July 15, 2010

माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा


खैरलांजी प्रकरणात मुम्बई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल अनपेक्षित नव्हता. तो यासाठी की तो तसाच यावा असेच प्रयत्न सगळ्याच यंत्रनेने मनापासून केले त्यात ते यशस्वी झाले याचा अर्थ ते जिंकले आणि न्यायासाठी प्राणपनाने लढणारे पराभूत झाले असे नाही. कोर्टाचा निर्णय हा न्याय असतो. हे आता केव्हाचेच कालबाह्य झाले आहे. तो केवल आरोपी आणि फिर्यादीना दिलेला एक निकाल असतो.
न्याय व्यवस्था हा लोकाशाहिताला अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. माध्यम आणि विधिमंडल व् मंत्रीमंडलाची राजकारनाने काय अवस्था केली आहे. हे सगलेच जाणतात. केवल न्यायव्यवस्थेवरच समाजाचा थोडासा विश्वास होता तोही आता धुलित मिळाला आहे.या सगल्या व्यवस्थेत माणूस असतो तो जोपर्यंत निकोप असत नाही तोपर्यंत सगळी व्यवस्थाच कुचकामी आहे नेमके हेच खैरलान्जीच्या संदर्भात घडले. अत्यंत पूर्वग्रहदूषित भावनेने हे प्रकरण हतालले गेले
एका आन्धल्या पोराला, अजान पोरीला,पोराला आणि त्यांच्या आईला कृरतेने ठेचून थर मारले गेले त्यांची प्रेते नग्नावस्थेत गावाच्या बाहेर फेकली गेली. ज्यानी ते केले त्यांनाही पश्चाताप नाही यामागे केवल व्यक्तिगत कारण असू शकत नाही हे शेम्बड़े पोरही जानते पण न्यायालयाला कळत नाही.
म्हणून दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यात हे बसत नाही. यात कुठलाही विनयभंग नाही.अंध मुलाला ठार करणे यात कुठलीही क्रूरता नाही जे गेले त्यांच्याबाबत दु;ख आहेच, पण ज्यानी हे घृणित कृत्य केले त्यांच्याही बाबत आमच्या मनात दयाभाव कमी नाही. असा आमचा माणुसकीचा धर्म अफाट आहे
गवई बंधू , पोचिराम काम्बले मनोरमा काम्बले, अशा असंख्य प्रकरणाला या आमच्या माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा झाली आहे खैरलान्जिला तर या बाधेने अक्षरश; गिलून टाकले आहे
न्यायचे काहीही होवो ह्या आमच्या माणुसकीच्या धर्माची अफाटता कायम राहिली पाहिजे