Monday, August 16, 2010

कवितेच्या काळजातला पीळ निसटला....


आज वर्गात तास सुरु असताना सुर्वे गेल्याची दु:खद बातमी समजली आणि ; एक नि:शब्द स्तब्धता वर्गात पसरली, अगदी " नेहरू गेले त्या दिवसा सारखी " सगळेच चेहरे अगदी कोरे , भाव हरवलेले फक्त " सुर्वे गेले " एवढेच शब्द वर्गात घुमत राहिले,मराठी कवितेच्या काळजतला हा तळातल्यांच्या वेदनेचा पीळ असा अचानक निसटून गेला मराठी कवितेची सतत सलणारी , माणसाला त्याच्या दु:खाची जाणीव करून देणारी सल आता कायमची काळाच्या आणि या पोकळीच्या पल्याड निघून गेली ।

सुर्वे कवी होते त्याहीपेक्षा ते परिपूर्ण माणूस होते। एक अत्यंत संवेदनशील तेवढेच विनयशील असणारे सुर्वे त्यांच्या वाट्याला आलेल्या आयुष्याबाबत कुठलीही तक्रार न करता जगले। थोड़े थोडके नव्हे तर ८४ वर्षे ते जगले नातूच नव्हे तर पंतुनच्याही वाट्याला ते आले। मराठी माणूसच त्यांच्या कवितेचा चाहता नव्हता जगातल्या सगळ्या भाषेतल्या काव्य रसिकाना त्यांच्या कवितेने वेड लावले होते । माणसांबद्दल बोलणारे , माणसांमध्ये रमणारे, सतत माणसांचाच विचार करणारे सुर्वे कवितेच्या कुळाला नव्या मानव्याची कुस बहाल करू इच्छित होते । मूलत: कवी हा सामाजिक संपत्ति असतो। तो जे देतो ते इतराना देता येत नाही । तो संवेदना घेतो आणि मानुषता देतो, माणसाला नवा अर्थ बहाल करतो। सुर्व्यानी आपल्या कावितेतून ते दिले आहे ।

मराठी सहित्यविश्वाला या वर्षात जे धक्के बसत आहेत त्यातला आणखी हा एक मोठा धक्का आहे विंदा , भाल, चित्रे गेले आता सुर्व्याना निरोप देण्याची वेळ आपल्यावर आली आहे । सुर्व्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment