Wednesday, April 14, 2010

माणूस बदलतो त्या दिशेने ............


काळ आणि माणूस
यांच्या अभिन्न नात्यातून जन्माला आलेलं आयुष्य
भाजून निघालय भूतकाळाच्या तव्यावर
जातीचं अमूर्त भांडवल. धर्माचे स्थावर जंगम
मी अजूनही होत नाही नादार
या जागतिकीकरणाच्या नादात
आरत्यांचा आक्रोश, दातृत्वाचा दंभ
भंगून गेले आहे विवेकाचे खांब
भावनांचे दुखणे वाढले आहे
धरले आहे सगळ्याच महापुरुषांना वेठीस
विटंबनेच्या आगीत माणुसकीची झालेली राख
पसरली आहे आमच्या घरादारांवर
वाऱ्यावर उडते आहे जिन्दगानी
आम्ही गात आहोत ग्लोबल गाणी

बाबासाहेब! काळाने बदलली आहे कूस
तुमच्याशिवाय बोलतच नाही कुठलाही माणूस
अनटचेबल असणारे तुम्ही
झाले आहात जगाची गरज
विटाळाचा तर सोडाच बाबासाहेब
सगळेच उभे आहेत एका रांगेत तुमच्यामागे ताटकळत
तुम्हाला टाळून कोणीच पुढे जाऊ शकत नाही
तुम्हाला सोडून कोणालाच आता पूर्ण होता येत नाही
माणस बदलली कि, काळ बदलला
काहीच काळात नाही, बाबासाहेब!
पण तुम्ही झाला आहात या युगाचा कळस
काळाने झटकून टाकलाय आपला आळस
विकाराचे पक्षी गेले आहेत उडून
खोप्यावरची बुरशी गेली आहे झाडून

हे आकाश कस झाल आहे निळ- निळ स्वच्छ
काळ्या ढगांचे तांडे झाले आहेत बेपत्ता
वादळाने कोंडून ठेवले स्वताला बेमुदत
कोणीच का गात नाही माणसांच्या कल्याणाचे पावडे!
का लोंबकळत आहे लोकशाहीच्या झाडावर
आमच्याच अस्मितेचे सांगाडे ?

बाबासाहेब! समतेला झाली आहे तुमची आदत
ममतेला लागते तुमचीच मदत
बंधुत्व तुमच्या आधाराशिवाय उभाच राहू शकत नाही
तुमच्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थच उरत नाही
कुठे मुरत आहे सामाजिक न्यायचे पाणी काळात नाही
उजेडच्या फांदीवर वसलेला कावळा उडता उडत नाही

अंधाराचे कलेवर खांद्यावर घेऊन
तुम्ही आलात धावत मझ्या दिशेने बेभान
तुडवत वर्णाचे पर्वत
जाळत जातीचे इमले
फेकून दिले मानगुटीवर बसलेले धर्माचे झमेले
तुम्ही शोधलाय एक नवा माणूस
तो असतो जातीधर्मवर्णाच्या पल्याड
जो काळाला खेळवतो हातावर
अस्तित्वाचा झुला बांधतो अवकाश्याच्या छतावर
तो घेतोय सूर्य उशाला
आकाशाची पांघरतो चादर
पृथ्वीची करतो घागर
त्याला नसते जगण्याची चिंता आणि मरणाची भीती
तो पकडत नाही बुरसटलेल्या रूढी परंपरेचा हात
पाळत नाही रीतीरिवाज
अडकत नाही संस्कृती- संस्काराच्या बंधनात
तो सापडतो तुम्हाला निरंजनेच्या काठावर
पिंपळाच्या पानावर
तो उठतो समाधीतून
मारतोय हाक वास्तवाला
तो अन्गुलीमालाला देतोय हात
अति मत्त हत्तीवर करतो मात
तुम्ही दिलाय त्याच्या हातात आमचा हात
अंधाराचे कलेवर पळून गेले रातोरात

बाबासाहेब! काळ कधीच थांबत नसतो
ताटकळत आपल्या दारावर
तो वर्तमानाला लावतो पटकन भूतकाळाचा चेहरा
भविष्याची बदलतो दिशा
माणसाला देतो नवी भाषा
विश्वाच्या गुळावर एल. पी. जी.च्या माशा
गळाला बांधलेला ग्याट चा घन्टा तोडायचा कसा
हरेक माणूस त्यांच्या गळाचा मासा
समाजवाद पडलाय घोरत भांडवलदाराच्या दारात
साम्यवादाने तानल्याय तंगड्या आपल्याच घरात
साम्यवादानंतर भांडवलशाही
भांडवलशाहीनंतर काय?
भांडवलशाहीनंतर समाजवाद
समाजवादानंतर काय?
सगळ्याच महासत्तांना लागली आहे चिंता
या मंदीच्या काळात आपल्या अस्तित्वाची
सगळ्याचेच आता चुकले आहे गणित
त्यांनी भैवातीकाचा केला गुणाकार
माणसाची केली बाजाबाकी
मूल्यांचा केला भागाकार
सगळ्यांच्याच हाती उरले एक शून्य
सगळेच स्वनाम धन्य!
शोधत आहेत आपले अस्तित्व
बाबासाहेब! तुम्ही एक पूर्ण सत्य
तुम्ही बांधली आमच्ची गाठ अनित्याशी
आम्ही धरली आहे तुमच्या तत्वाची कास
आता माणूस बदलतो त्या दिशेने आमचा प्रवास
माणूस बदलतो त्या दिशेने आमचा प्रवास

सतेश्वर मोरे

Friday, April 9, 2010

आंबेडकरी कार्यकर्ता संवाद परिषद् वर्धा

हा संवाद होणे गजेचे आहे. पण आपण तयार आहोत काय ? आपल्याकडे उत्तरच नाही! कार्यकर्त्ता हा समाजाच्या गतीची नाड़ी आहेतो आहे म्हणूनच समाज समाज म्हणून जिवंत आहे पण त्याच्या जगण्याचे काय? याचा आपण कधीच गम्भिर्याने विचार करीत नाही वर्धेत हा विचार झाला। वर्धेकरंचे अभिनन्दन !

माई रमाईचा पुतला आणि मी




गेल्या अप्रैल महिन्यातल्या चार तारखेला मी महाराष्ट्राचे समाज कल्याण संचालक म़ा. इ. झेड खोब्रागडे यांच्या जन्मगावी सवारी (बिड़कर) जि. चंद्रपुर येथे माई रमाई च्या प्रतिकृतिच्या अनावरनाला आणि खोब्रागडे दाम्पत्याच्या सत्कार सोहाल्याचा निमित्ताने या सोहाल्याचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.याचा मला आनंद यासाठी झाला की महाराष्ट्रात मी कुठेच रमाई ची प्रतिकृति पाहिली नाही पहिल्यांदा महाराष्ट्रात माई च्या प्रतिक्रुतिचे अनावरण होते आणि मी त्या समारंभाचा अध्यक्ष असतो दुसरे असे की मुलाचे कौतुक एखाद्या गावाने करणे हे जेवढे कौतुकास्पद आहे त्याहीपेक्षा आपल्या गावाच्या सुनेचा सत्कार जेव्हा एखादे गाव करते ते गाव आदर्श आहे असे मला वाटते या अर्थाने आयुष्यमती खोब्रागडे ताईचा सत्कार करणारे सावरी (बिड़कर) हे गाव आदर्श गाव आहे. महाराष्ट्राच्या आदर्श ग्राम योजनेत हा निकष समाविष्ट करावा आणि सावरीला आदर्श ग्राम पुरस्कार द्यावा अस मी म्हणालो याप्रसंगी इ. झेड आणि खोब्रागडे ताई नि जे विचार व्यक्त केले ते प्रेरणादायक आहेत हां माझ्या आयुष्यातला अत्यंत अत्यंत अविस्मर्णीय समारोह आहे अशोक बुरबुरे यांच्या उपस्थितिने तर दुधात साखरच पडली