+243.jpg)
+244.jpg)
गेल्या अप्रैल महिन्यातल्या चार तारखेला मी महाराष्ट्राचे समाज कल्याण संचालक म़ा. इ. झेड खोब्रागडे यांच्या जन्मगावी सवारी (बिड़कर) जि. चंद्रपुर येथे माई रमाई च्या प्रतिकृतिच्या अनावरनाला आणि खोब्रागडे दाम्पत्याच्या सत्कार सोहाल्याचा निमित्ताने या सोहाल्याचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.याचा मला आनंद यासाठी झाला की महाराष्ट्रात मी कुठेच रमाई ची प्रतिकृति पाहिली नाही पहिल्यांदा महाराष्ट्रात माई च्या प्रतिक्रुतिचे अनावरण होते आणि मी त्या समारंभाचा अध्यक्ष असतो दुसरे असे की मुलाचे कौतुक एखाद्या गावाने करणे हे जेवढे कौतुकास्पद आहे त्याहीपेक्षा आपल्या गावाच्या सुनेचा सत्कार जेव्हा एखादे गाव करते ते गाव आदर्श आहे असे मला वाटते या अर्थाने आयुष्यमती खोब्रागडे ताईचा सत्कार करणारे सावरी (बिड़कर) हे गाव आदर्श गाव आहे. महाराष्ट्राच्या आदर्श ग्राम योजनेत हा निकष समाविष्ट करावा आणि सावरीला आदर्श ग्राम पुरस्कार द्यावा अस मी म्हणालो याप्रसंगी इ. झेड आणि खोब्रागडे ताई नि जे विचार व्यक्त केले ते प्रेरणादायक आहेत हां माझ्या आयुष्यातला अत्यंत अत्यंत अविस्मर्णीय समारोह आहे अशोक बुरबुरे यांच्या उपस्थितिने तर दुधात साखरच पडली
No comments:
Post a Comment